पुण्यात राहणाऱ्या सुरेश यांना धुकं जीवावर बेतलंय. पहाटेच्या वेळी मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर झालेल्या अपघातात सुरेश यांचा जीव गमवावा लागलाय. सुरेश यांच्या कुटुंबासाठी हा मोठा आघात होता. काही दिवसानंतर सुरेश यांच्या कुटुंबाला सुरेश यांनी 20 लाख रुपयांचा वैयक्तिक अपघात विमा घेतल्याचं समजलं. आता हा अपघात विम्यावर दावा करण्यासाठी सुरेश यांच्या कुटुंबाला काय करावं लागणार ? आता प्रकरण अपघाताचं असल्यानं विमा क्लेम करण्यासाठी विम्याचा दावा करण्यासाठी FIR पण गरजेा आहे. पोलिसांनी अपघाताची नोंद केलीय मात्र,अद्याप FIR दाखल झालेला नाही. अशावेळी सुरेश यांच्या कुटुंबाला अपघाती विमा मिळणार का ? पाहूयात.
अपघात प्रकरणी विम्याच्या दाव्यात FIR अत्यंत गरजेचा आहे. पोलिसांनी चौकशी करून FIR दाखल केलेला आहे त्यामुळे गैरव्यवहार होण्याची शक्यता नसल्याची खात्री कंपनीला वाटते त्यामुळे विम्याचा दावा लवकर निकाली लागतो. अपघात झाल्यांतर तात्काळ विमा कंपनीला पॉलिसीचीच्या तपशीलासह माहिती द्या,तसेच अपघातात झालेल्या नुकसानीची माहिती द्यावी. अपघाताची माहिती विमा कंपनीला ई-मेल किंवा हेल्पलाईनवर फोन करून देता येते,माहिती देण्यासाठी एफआयर गरजेचा नाही,असा सल्ला डिजिटल जनरल इन्शुरन्सचे वरिष्ठ व्यवस्थापक डॉ.राजा तंवर यांनी दिलाय. कंपनीला माहिती मिळाल्यानंतर कंपनी तुमच्याकडून माहिती घेण्यासाठी महत्वाच्या कागदपत्रांच्या मागणीसाठी यादी पाठवते. दाव्याच्या फॉर्मसोबत संपूर्ण कागदपत्र मिळाल्यानंतर विमा कंपनीकडून विम्याची रक्कम जारी करण्यात येते. या महत्वाच्या कागदपत्रात FIR चाही समावेश असतो.
अपघात मृत्यूप्रकरणी FIR अत्यंत गरजेचा आहे. FIR नंतरच पोलिस पोलिस पोस्टमार्टम आणि पुढील कारवाई करण्यात येते. त्यामुळे विमा कंपनी दावा मंजूर करण्यासाठी FIR आणि शवविच्छेदन अहवाल म्हणजेच पोस्टमार्टमची रिपोर्टची मागणी करते. तसेच अपघातात एखादा व्यक्ती जखमी व्यक्तीवर हॉस्पिटलमध्ये उपचार केल्यास दाव्याच्या फॉर्मसोबत वैद्यकीय अहवाल जोडावा लागतो. मेडिकल अहवालचा अभ्यास केल्यानंतर विम्याची रक्कम मिळते,अशी माहितीही तंवर यांनी दिलीय. अपघाती विम्याचा दावा मंजूर करण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे? ते पाहूयात. विमा पॉलिसीची प्रत,मृतक व्यक्तीचा पत्ता आणि ओळखपत्र.FIR, पोस्टमार्टम अहवालाची प्रत, उपचार झालेला असल्यास हॉस्पिटलमधील मेडिकल रिपोर्ट,तसेच वारसदारांच्या केवायसी आणि बँक खात्यांचा तपशीश द्यावा लागतो. विमा पॉलिसीमध्ये वारसदाराची नोंद नसल्यास वारसदारांना उत्तराधिकार प्रमाणपत्र जमा करावे लागते.
नियमानुसार अपघात झाल्यानंतर अपघाती विम्याचा दावा साधारणपणे 30 दिवस म्हणजेच एका महिन्याच्या आत दाखल करावा लागतो. एका महिन्यानंतर दावा दाखल केल्यास दाव्याच्या विलंबाची कारणं द्यावी लागतात. दाव्याशी संबंधित सर्व कागदपत्रं मिळाल्यानंतर विमा कंपनीला एका महिन्याच्या आत दाव्याची रक्कम द्यावी लागते. संपूर्ण कागदपत्रं सादर केल्यानंतरच विमा कंपनी दावा मंजूर करत असल्यानं अपघाती विम्याचा दावा करताना सर्व कागदपत्रं दाव्यासोबतच एकत्रितपणे सादर करा. बऱ्याचदा विमा कंपन्या काही खुलाशासाठी आणखी कागदपत्रांची मागणी करू शकते. माहिती देतेवेळी तुम्ही सतत बयान बदलत असल्यास दावा मंजूर होत नाही.
कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षेसाठी वैयक्तिक अपघात विमा हा सर्वोत्तम पर्याय आहे. सुरेश यांच्या कुटुंबाप्रमाणं अपघाती विमा तुमच्या कुटुंबालाही संकटमोचक ठरू शकतो. कोणत्याही विम्यावर दावा करण्यासाठी दुर्घटनेनंतर तात्काळ कंपनीला माहिती द्या. त्यानंतर आवश्यक कागदपत्रं जमा करा. दावा करतानाच सर्व कागदपत्रे सादर करा, म्हणजे विमा लवकर मंजूर होतो.
पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App