-
टर्म प्लॅन आणि SIP असा कॉम्बो खरेदी करण्याचा सल्ला सगळे फायनान्शिअल एडव्हायजर देऊ लागले. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे, त्यामुळे ULIP कडे आपण एका नवीन दृष्टिकोनातून बघण्याची गरज आहे. चला तर मग ULIP चे फायदे काय आहेत, ते जाणून घेऊया.
-
आत्तापर्यंत पॉलिसी पहिल्या 3 वर्षात सरेंडर केली तर काहीच रक्कम मिळत नव्हती. तसेच, पॉलिसीची 50% टर्म संपायच्या आधी पॉलिसी सरेंडर केली तर जेवढे पैसे भरले आहेत त्यापेक्षा कमी किंवा साधारण तेवढीच रक्कम पॉलिसीहोल्डरला दिली जायची. यामुळे, पॉलिसीहोल्डरला तेवढ्या वर्षांचं व्याज मिळत नव्हतं. म्हणून पॉलिसीहोल्डरच्या हितासाठी IRDA ने सरेंडर व्हॅल्यूच्या नियमांमध्ये बदल केले आहेत, हे काय नियम आहेत, ते आता जाणून घेऊया.
-
कंपनीने क्लेम रिजेक्ट केला पण कंपनी विरोधात आपल्याला कुठे तक्रार करावी लागेल, तक्रार करून न्याय मिळेल का आणि त्यासाठी किती खर्च येईल, असे अनेक प्रश्न अथर्वच्या मनात आहेत. चला तर मग या प्रश्नांचे उत्तरं जाणून घेऊया.
-
ज्या तारखेला पॉलिसीचे पैसे मिळणार आहेत, तेव्हापासून पुढचे 6 महिने जर ग्राहक किंवा त्याच्या नॉमिनीने त्यावर दावा नाही केला तर त्याला अन्क्लेम्ड रक्कम म्हणतात. सध्या इंश्युरन्स कंपन्यांकडे अशी 25000 कोटींची अन्क्लेम्ड रक्कम पडून आहे. ही रक्कम ग्राहकांच्या हक्काची आहे, त्यामुळे ग्राहकांपर्यंत ही रक्कम पोहोचवणं इंश्युरन्स कंपन्यांची जवाबदारी आहे. म्हणूनच ग्राहकांना ही रक्कम लवकरात लवकर परत करा, असे आदेश IRDA ने इंश्युरन्स कंपन्यांना दिले आहेत.
-
भारतानं विमा क्षेत्रात परकीय भांडवलाचे नियम शिथिल केल्यानंतर गेल्या नऊ वर्षांमध्ये 54 हजार कोटी रूपयांची थेट परकीय गुंतवणूक झाली आहे,अशी माहिती केंद्रीय वित्तीय सेवा सचिव विवेक जोशी यांनी दिलीय. 2014 मध्ये विमा क्षेत्रात परकीय गुंतवणुकीची मर्यादा 26 टक्के होती, 2015 मध्ये 49 टक्के होती तर 2021 मध्ये 74 टक्के करण्यात आली
-
सध्या मिस-सेलिंगचे प्रकार अनेक ठिकाणी होत आहेत. अश्या प्रकारे इंश्युरन्सची चुकीच्या पद्धतीने विक्री होती म्हणून, विमा नियामक IRDA ने आता 55 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी डिझाइन केलेल्या विमा पॉलिसीची छाननी करून एक मोठं पाऊल उचललं आहे. यामध्ये, जीवन आणि आरोग्य विमा या दोन्ही पॉलिसीचा समावेश आहे.
-
हेल्थ इंश्युरन्सचं महत्व आपल्याला जेवढ्या लवकर कळेल, तेवढं चांगलं आहे. दुर्दैवाने बऱ्याच लोकांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होई पर्यंत हेल्थ इंश्युरन्सचं महत्व कळात नाही. बऱ्याच लोकांना हेल्थ इंश्युरन्सचं महत्व माहित असतं, पण आज पॉलिसी काढू उद्या काढू असं करता करता अनेक वर्ष निघून जातात. मग अचानक घरातल्या एखाद्या व्यक्तीला ऍडमिट करावं लागलं कि बिलाचे आकडे बघून डोळे उघडतात.
-
कमी पैशात जास्तीतजास्त सुविधा मिळाव्या अशी प्रत्येक ग्राहकाची अपेक्षा असते, तसाच विचार अमनदेखील करतोय. तो एका ऑल-राऊंड मेडिक्लेम पॉलिसीच्या शोधात आहे. या संदर्भात रिसर्च करताना त्याला मणिपाल सिग्नाच्या लाईफटाइम हेल्थ पॉलिसीची माहिती मिळाली. या पॉलिसीमध्ये असणाऱ्या 5 महत्वाच्या फीचर्सने अमनचं लक्ष वेधून घेतलं.
-
पॉलिसीबाझारने जाहीर केलेल्या अहवालानुसार 26 ते 35 वयोगटातील 33% पगारदार लोकं प्रथमच आरोग्य विमा खरेदी करताना मंथली पेमेंट मोड निवडतात. हा ट्रेंड टियर-3 शहरांमध्ये अधिक लोकप्रिय आहे, या ठिकाणी 26 ते 35 वयोगटातील 44% लोकांनी मंथली पेमेंटची निवड केली आहे. टियर-2 शहरांमध्ये हा आकडा 31% आणि मेट्रो शहरांमध्ये 23% आहे. मंथली पेमेंट मोडची लोकप्रियता वाढतीये, हा पर्याय नक्कीच सोईस्कर आहे मात्र यामध्ये काही जोखीम आहे का, ते आता जाणून घेऊया.
-
भारतात दर तासाला 19 लोक रस्ते अपघातात मृत पावत आहेत. घरातून बाहेर जायचे म्हंटले की अपघाताची भीती असते. अशावेळी अपघात विमा पॉलिसी असणे महत्वाचे आहे