यंदा दुष्काळामुळे ऊस उत्पादनात घट होणार असल्यानं सरकारनं यंदाच्या गळित हंगामात साखरेपासून इथेनॉल निर्मितीऐवजी साखर निर्मितीवर भर देण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत
साखरेचा पुरवठा सुरळित ठेवण्यासाठी केंद्र सरकार यंदाच्या गळित हंगामात साखरेपासून इथेनॉल निर्मितीवर बंदी घातली. भारत हा जगातील दुसऱ्या क्रमाकांचा साखर उत्पादक देश आहे. मात्र, यावर्षी महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात पाऊस कमी झाल्यामुळे साखरेच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.
उसाचा रस आणि बी दर्जाच्या उसाच्या मळीचा इथेनॉल निर्मितीमध्ये वापर करण्यास सरकार प्रतिबंध घातलं आहे. उसाचा रस आणि मळीमध्ये मोठ्या प्रमाणात सुखरोज आढळून येते. साखर कारखानदारांकडून तेल कंपन्या इथेनॉल खरेदी करतात आणि गॅसोलिनमध्ये मिक्स करतात. उसाच्या मळीपासून आणि रसापासून तयार होणाऱ्या इथेनॉलला चांगला दर मिळतो.
साखरेचे दर 14 वर्षाच्या उच्चाकांवर
किरकोळ बाजारात साखरेचे दर हे सध्या 42 रुपये किलोवर पाहोचले आहेत. मात्र, कारखान्याना 3,600 ते 3,700 रुपयांपर्यतच दर मिळतो. दिवाळीनंतर साखरेची मागणी कमी झाली आहे. गळित हंगाम सुरू होऊनही नवीन साखर बाजारात आली नाही. तसेच महाराष्ट्रात ऊसाच्या दरावरून आंदोलनही सुरू आहे. त्याचमुळे मागणी आणि पुरवठ्याची परिस्थिती लक्षात घेऊन मंत्रिमंडळ समिती यंदा साखरेच्या उत्पादनावर भर देण्याबाबत निर्णय घेणार आहे. साखरेचा वापर इथेनॉल निर्मितीत कमी झाल्यानंतर बाजारात साखरेचा पुरवठा सुरळित होऊ शकतो. सरकारच्या या निर्णयाचा फटका साखर कारखानदारांना आणि इथेनॉल उद्योगाला बसणार आहे
इथेनॉल बंदीचा फटका शूगर शेअर्सला
साखरेपासून इथेनॉल निर्मितीबाबत सरकारनं मोठा निर्णय घेतल्यानं शेअर बाजारातील साखर उत्पादक कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली. बलरामपूर चिनी मिल्स, दालमिया भारत शुगर, श्री रेणुका शुगर आणि त्रिवेणी इंजिनिअरिंगच्या शेअर्समध्ये तीन टक्क्यांहून अधिक घसरण झाली. तसेच प्राज इडस्ट्रीजचा शेअरही सुमारे साडे चार टक्के खाली आलाय.
Published: December 7, 2023, 14:09 IST
पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App