Home > बांधकाम व्यवसाय
तुमच्या आयुष्यावर आणि खिशावर परिणाम करणाऱ्या अर्थविश्वातल्या बातम्या
स्वत:चं घर खरेदी करण्याचं अनेक जण स्वप्न पाहात असतात. मात्र,अनेकजणांना घर खरेदीसाठी कोणती योग्य वेळ आहे ? हे समजत नाही.त्यामुळे घर खरेदीसाठी सध्याचाच काळ आणि वेळ योग्य आहे.
2024 मध्ये देखील घरांच्या मागणीमध्ये वाढ कायम राहणार आहे,असा अंदाज बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांनी वर्तवलाय.
मुंबईला भारताच्या मुख्य भूभागाशी जोडणारे अंतर कमी करणारा आणि प्रवासाच्या वेळेत बचत करणारा ‘अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतू’ लोकार्पणासाठी सज्ज झाला आहे. मुंबईसह परिसराची सर्वांगीण उन्नती साधणारा, प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी घेणारा आणि मुंबई शहराच्या चौफेर विस्तारासाठी साहाय्यभूत ठरणारा हा सेतू ‘गेमचेंजर’ ठरणारा असेल हे निश्चित… लोकार्पणानिमित्त अटल सेतूबाबतची थोडक्यात माहिती देणारा हा लेख..
तुमच्या उत्पन्नावर आणि खिशावर परिणाम करणाऱ्या अर्थविश्वातल्या बातम्या
पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यास जोडणाऱ्या लातूर-मुरुड-येडशी-कुसळंब-बार्शी-कुर्डूवाडी-टेंभुर्णी या महामार्गाचा वापर वाढत आहे. सध्या या रस्त्यावर १५ हजार पॅसेंजर कार युनिट (PCU) इतकी वाहतूक होते. त्या पार्श्वभूमीवर लातूर ते टेंभूर्णी रस्त्याचे चौपदरीकरण तातडीने होणे आवश्यक आहे
अदानी समूहाने धारावीसाठी स्वतंत्र शौचालये, हवेशीर स्वयंपाकघर आणि कौटुंबिक वास्तव्यासाठी तसेच विश्रांतीसाठी परिपूर्ण खासगी घरांची निर्मिती; गजबजलेल्या दुकानांचा उदय आणि भरभराट करणारे व्यवसाय त्याचप्रमाणे व्यावसायिक व नोकरीच्या संधींची निर्मिती; आणि स्थानिक समुदायाची उन्नती असे एक वास्तवात येणारे नवजागरणाचे स्वप्न पहिले आहे.
चांगली नोकरी पाहिजे असेल तर अनेकांना पुणे मुंबईसारख्या शहरात शिफ्ट व्हावं लागतं. भारतातल्या शहरात रेंटमध्ये मागच्या 1 वर्षात खूप मोठी वाढ झाली आहे, विशेष म्हणजे ही वाढ केवळ मेट्रो शहरांपुरतीच मर्यादित नाहीये. राहण्यासाठी चांगलं घर असावं असं प्रत्येकाला वाटतं. मात्र, त्यासाठी पगाराचा 20 ते 30 भाग खर्च करावा लागतो. मात्र, पगारचा किती भाग रेंटसाठी खर्च करावा यासाठी काही थम्ब रुल आहे, का ते आता जाणून घेऊया.
गृहनिर्माण विभागाशी संबंधित शासनाकडे प्रलंबित असलेले विषय तातडीने मार्गी लावावेत. गिरणी कामगारांना हक्काची घरे मिळण्यासाठी प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत ठेवण्यात यावा. कामाठीपुरा पुनर्विकास प्रकल्पासंदर्भात कामे अधिक वेगाने करावीत. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील येथील आदिवासी व अतिक्रमित झोपडपट्टीधारकांच्या पुनर्वसनासाठी ‘म्हाडा’ व नगरविकास विभागाने तातडीने कार्यवाही करावी. तसेच मुंबईतील ‘म्हाडा’च्या मालकीच्या जागेवर असलेल्या 27 पोलीस वसाहतींचा विकास म्हाडामार्फत करण्यात यावा, असे निर्देश यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी संबंधितांना दिले.