जागतिक व्यापार संघटनेच्या बैठकीत कृषी अनुदानाच्या मुद्यावरून संघर्ष पेटला php // echo get_authors();
?>
जागतिक व्यापार संघटनेच्या बैठकीतील वातावरण तापले आहे. कृषी अनुदानाच्या मुद्यावर संघर्ष पेटला आहे. भारत आणि थायलंड आमने-सामने आले आहेत आणि अबूधाबीच्या वर्तमानपत्रात त्याच बातम्या मुख्य आहेत. भारतासह इतर 80 देशांनी धान्याची साठवणूक करण्यासाठी धान्य खरेदीवर अनुदान देण्याची मागणी केली आहे. विकसित आणि विकसनशील देशातील एक गटाचा या निर्णयाला विरोध आहे.
जागतिक व्यापार संघटनेच्या बैठकीतील वातावरण तापले आहे. कृषी अनुदानाच्या मुद्यावर संघर्ष पेटला आहे. भारत आणि थायलंड आमने-सामने आले आहेत आणि अबूधाबीच्या वर्तमानपत्रात त्याच बातम्या मुख्य आहेत. भारतासह इतर 80 देशांनी धान्याची साठवणूक करण्यासाठी धान्य खरेदीवर अनुदान देण्याची मागणी केली आहे. विकसित आणि विकसनशील देशातील एका गटाचा या निर्णयाला विरोध आहे.
भारताने अनुदानाचा वापर करून धान्य खरेदी केले आणि त्याच धान्याची निर्यात केल्याचा आरोप थायलंडने केल्यानंतर वातावरण चिघळले आहे. भारताने जागतिक व्यापार नियमाचं उल्लंघन केले आहे,असा आरोप थायलंडने केला आहे.या आरोपानंतर भारताने थायलंडच्या प्रतिनिधीला बहिष्कृत केले आहे. थायलंडच्या प्रतिनिधीसोबत भारत कोणतीही चर्चा करणार नसल्याचे भारताने स्पष्ट केले आहे.
कृषी अनुदानाच्या मुद्यावर जागतिक व्यापार संघटनेतील सदस्य दोन गटात विभागले आहेत. अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया या देशांनी थायलंडच्या वक्तव्याचे स्वागत केले आहे. याच देशांनी भारताच्या कृषीविषयक प्रस्तावात अडथळे निर्माण केले आहेत.
शेती अनुदाचा प्रश्न जटिल आणि क्लिष्ट आहे. विकसनशील देशांना एकूण उत्पादनापैकी फक्त दहा टक्केच भात खरेदी अन्न सुरक्षेसाठी करता येते. यामुळे स्वस्तात तांदळाची निर्यात रोखता येते. बाली येथे पार पडलेल्या जागतिक व्यापार संघटनेच्या बैठकीत कृषीविषयक एका तरतुदीवर सहमती झाली होती. विशेष परिस्थितीत विकसनशील देश निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त खरेदी करू शकतात,अशी सवलत या तरतुदीअंतर्गत देण्यात आली होती. भारताने या सुविधेचा वापर केला आहे आणि यालाच विरोध होत आहे. शेतकऱ्यांचं हित जपण्यासाठी भारताला या मुद्यावर कायमस्वरूपी तोडगा हवा आहे. विकसित देश या मुद्दयावर कोणतीही सवलत देण्यास राजी नाहीत. विकसित देशांचा विरोध तीव्र असल्याने सहमती होण्याची सूतराम शक्यता नाही.
चर्चेचे ‘प्रेशर कुकर’
डब्ल्यू. टी. ओ. च्या चर्चेचे प्रेशर कुकरमध्ये रूपांतर झाले आहे,अशी मिश्किल प्रतिक्रिया जागतिक व्यापार संघटनेचे महासंचालक न्गोझी ओकोंजो-इवेला यांनी दिली आहे.आपण ‘प्रेशर कुकर’मध्ये अत्यंत तणावाच्या परिस्थितीत चर्चा करत आहोत हे खूप चांगले आहे,मात्र,तणावात चर्चा करणेही धोकादायक आहे. काय होतं ते पाहूयात,असंही इवेला यांनी म्हटलं आहे.
डब्ल्यू. टी. ओ. बिझनेस फोरममध्ये खासगी कंपन्यांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत इवेला उपस्थित होत्या. चर्चेतून फारसं काही निष्पन्न होणार नाही,असा विश्वास त्यांना वाटत होता. “आम्ही सकारात्मक पद्धतीने प्रयत्न करत आहोत. मात्र,अनेक मुद्दे क्लिष्ट असल्याने चर्चेत खोडा निर्माण झाला आहे”असं वक्तव्यही इवेला यांनी दिली आहे.
Published: February 29, 2024, 21:53 IST
पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App